राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (मंत्रालय, मुंबई) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील ३ तासांत आपल्या जिल्ह्यात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन अचानक येणाऱ्या या संकटामुळे जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि बाहेर असलेल्या नागरिकांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी. मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या या सूचनेनुसार, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज झाली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी.
0 Comments